माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

6.9.08

जीवन म्हणजे काय असते?

मला नेहमी पडणारा एक प्रश्न आहे. "जीवन म्हणजे काय असते?" जीवन म्हणजे काय हा प्रश्न काही प्रमाणात अनुत्तरीतच राहिला आहे. त्यासाठी मी वाचकांना नम्र आवाहन करून त्यांना "जीवन" हा विषय देऊन लिहायला भाग पाडणार आहे आणि त्यासाठी माझा ई-मेल आहेच - kavitashinde7 (at) gmail (dot) com
काही वाक्ये मी माझ्या अनुभवातून लेखात घातली आहेत आणि काही मला मनापासून वाटतं म्हणून लिहिलं याची कृपया वाचकांनी नॊंद घ्यावी आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की पाठवाव्यात.
माझ्या दृष्टीने "जीवन म्हणजे काय" याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
जीवन म्हणजे देवाने मानवासाठी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे आणि प्रत्येकाने ते आपापल्या पध्द्तीने गायले पाहिजे.

अर्थात ते सुरेल मात्र पाहिजे हं! माणसाच्या बाल्यावस्था, तरूणावस्था व वृध्दावस्था (आणि प्रौढावस्था सुध्दा) या अवस्था असतात. माझ्या दृष्टीने सर्वात चांगली अवस्था म्हणजे बाल्यावस्था होय. कारण याच अवस्थेत व्यक्तीच्या विकासास हातभार मिळत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर कुंभार ज्याप्रमाणे मडके घडवतो, त्याला जसजसा आकार देतो, तसतसे मडके घडत असते. जीवनाचेही अगदी तसेच आहे. बालपणापासून जे संस्कार मनात रूजत असतात. त्याचेच प्रत्यंतर तरूणावस्थेत होत असते. अर्थात याला व्यक्तीच्या आजुबाजूचा परिसर (ज्याला आपण म्हणतो surrounding) सुध्दा तितकाच कारणीभूत ठरतो. पण म्हणून का देवाने दिलयं जीवन म्हणून जगतच राहाव तर नाही. हे जीवन काहीतरी सत्कारणी लागले तर फ़ार बरे होईल ही सुध्दा जाणीव असायला पाहिजे आणि माझ्या मते, लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या गोष्टी मला निव्वळ मूर्खपणाच्या वाटतात. (मला कोणावर टिकाटिप्पणी करायची नाही). मला माहित आहे की, समाजव्यवस्था ही मानवानेच निर्माण केलेली आहे आणि नियमही समाजाला मानवतील असेच आहे. कारण आपण कोणतीही गोष्ट करतांना लोकांचा फ़ार विचार करतो. (माझा अनुभव) एखादी गोष्ट लोकांना आवडत नाही, म्हणून ती न करणे हा सर्वात मूर्खपणा आहे. तात्पर्य हेच, मन मारत जगणे काही योग्य नाही. जी गोष्ट तुम्हाला (किंवा तुमच्या कुटुंबाला) करावीशी वाटेल, ती दिलखुलासपणे करा. परंतु ती जर खरच चांगली असेल तर ती कशी चांगली हे पटवून द्यायला मात्र विसरू नका हं! नाही पटली तर काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट म्हणजे शिक्षण, नोकरी, लग्न इ. संबंधित असू शकते. (ज्याचा त्याचा अनुभव) (भाषण फ़ार लांब होत आहे का?) सुरूवातीला मी ज्या तीन अवस्था सांगितल्या, तुम्ही म्हणाल आपल्या लिखाणाशी याचा संबंध तो काय? पण वाचकहो, त्याचाच तर खरा संबंध आहे. कारण बाल्यावस्था, तरूणावस्था त्यानंतर प्रौढावस्था आणि सर्वात शेवटची (मानली तर) वृध्दावस्था ! ह्या अवस्थेत व्यक्ती सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून चुकते. कुणी नोकरीतून रिटायर्ड होते. म्हणकेच रिकामा, फ़ावला वेळ भरपूर मिळतो. ह्या अवस्थेत आपल्याला नव्या संधी प्राप्त होत असतात. त्या म्हणजे आपले अनुभव, आपल्यावर आलेले प्रसंग, बिकट प्रसंगांना आपण कसे तोंड दिले इ. हे व्रुध्द माणसे तरूणांना किंवा प्रौढांना सांगू शकतात. तसेच माझ्या मते, ब्लागवरून आपले विचार प्रकट करू शकतात. पण हे सर्व करतांना दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आपण गदा तर आणित नाही ना! याची सुध्दा काळजी घ्यायला हवी. कारण आपल्या देशात वृध्दाश्रमांची संख्या यामुळे तर वाढत नाहीये ना अशी माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. वृध्दांनी (आपल्या भाषेत ज्येष्ठ नागरिकांनी) दुसऱ्यांच्या इच्छा आकांक्षा मारणे ही गोष्ट निश्चितच योग्य नाही. तसेच तरूणांनी देखील वृध्दांना अपमानास्पद वागणुक देणे हे आपल्या संस्कृतीचे लक्षण नाही. तर मग करायचे तर काय करायचे? वृध्दांनी आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर मुलाच्या संसारात जास्त लक्ष देऊ नये. तो काय करतो किंवा काय करणार आहे हे तो सांगेल तरच ऎकावे. कारण आजच्या तरूणांना आपल्या मर्जीने काही गोष्टी कराव्या असे मनापासून वाटत असते. व्रुध्दांना जर काही सल्ला विचारला, त्यांचा अनुभव विचारला तर मात्र त्यांनी तो नक्की कथन करावा. मुलाला जर काही कामासाठी जर आपल्या व्रुध्द आई वडीलांची गरज पडत असेल तर त्यांनी मदत करावी. हे सर्व करतांना घरातील सूर बिघडणार नाहीत याची काळजी मात्र घ्यावी. खूप दिवसांपासून या विषयावर काहीतरी लिहावे असे मनापासून वाटत होते. आज वेळ मिळाल्यावर माझी इच्छा मी ब्लागच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली. आपल्याही इच्छा आपण पूर्ण करा आणि हसत खेळत जगा.

1 comment:

Unknown said...

jeevan he ek gaan aahe ani te gayal pahije . tyat sur aso kivha naso pan tari tyala gayan mhatal pahije . yacha arth gato yala mahtv dya to kasa gato aani ka gato yala mahavt naka devu. ka karan jeevan jaganaryani jeevan ved vakad jaga pan te jagata aal pahije yala mahavt dya ....char divasacha aayush aahe te sukhane jaga karan manasachya jeevanat sukh dukh yetch asatat to garib aso kivha sreemant aso pan te visaru jeevan jaga . yalach khar jeevan mhanta yeil aani yanech jeevanacha anubhav sudha yeil...aani ek gost ki aayush bhar kolha banun jaganyapeskha 10 divas vagh banun jaga ... mazya mate jeevan he asach jagal pahije tumhala patal tar thik...ok nice