माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

2.9.08

मराठी माणसा, जागा हो.........

आपण व्यावसायिक आहात की नोकरदार? नोकरदार असाल तर आहे त्याच नोकरीत समाधान मानता की अजून यशाच्या दोन पायऱ्या पुढे सरकायला तयार आहात? आपण म्हणाल हे विचारण्याचे कारण? तर कारण असे की, नोकरी करत असाल तर ज्या कंपनीमध्ये नोकरी करता तशी कंपनी आपल्यालासुध्दा उभी करता आली तर ? किंवा ज्या खुर्चीवर बसून बॉस तुम्हाला दोन - चार शब्द बोलतो (सर्वच बॉस नसतात हो असे) किंवा तुम्हाला बॉसची हांजी - हांजी करावी लागते त्या बॉसच्या जागी आपल्यालासुध्दा बसता आले तर ? हे असे विचार जर आपल्या मनात असतील तर आपल्या या विचारांना, कल्पनांना सत्य आणि वास्तव रूप देण्याचीसुध्दा आपल्यात ताकद आहे का याचा विचार करा. आपण म्हणाल, नोकरी चांगली आहे, पाच आकडी पगार आहे, कंपनीकडून बंगला, गाडी, मोबाईल सर्व सुखसोई आहेत मग हे असले विचार येतीलच कशाला ? पण थांबा, ह्या सुखसोई असल्यावरसुध्दा वेगळा विचार करणारे आपल्यातीलच खूपजण सापडतील. कारण काय, तर त्यांच्याजवळ कला आहे, कौशल्य आहे. त्यांना आपल्या मनातील कल्पनांना वास्तवाची जोड द्यायची आहे. परंतु त्यांच्या आड येत आहे ती नोकरी. मग ही नोकरी सोडून दिली तर आपल्यातील कौशल्याला भरारी मारता येईल का? की नंतर नोकरी सोडल्याचा पश्चाताप करावा लागेल हे सुध्दा विचार मनाला शिवल्याशिवाय राहणार नाहीत. हे विचार नक्कीच एका मराठी माणसाचेच असतात (काही अपवाद वगळता). वरील चर्चा करण्याचे एकच कारण, जास्तीत जास्त मराठी लोकांनी व्यवसाय पत्करावा. व्यवसाय पत्करण्याचे एक कारण असे की, व्यवसायात मराठी माणुस कमीत कमी उतरतो. दुसरे असे की, त्याला एकदाचे स्थैर्य हवे असते आणि ते फ़क्त नोकरीतच असे त्याला वाटत असते. मला असे म्हणायचे नाही की, नोकरी मूळीच करू नका.परंतु नोकरी करून जर तुम्हाला आपल्या अंगभूत गुणांना वाव द्यायची संधी मिळाली तर ती मूळीच सोडू नका. व्यवसाय करायचा म्हटला तर प्रत्येक माणसाचा पहिला प्रश्न तो म्हणजे भांडवल. कारण कोणताही व्यवसाय करायचा म्हटला की तोच प्रश्न भेडसावतो. माझ्या मते, प्रत्येक युवकाने जर संघटीत झाले तर हा प्रश्न सोडवायला काही प्रमाणात तरी मदतच होईल. व्यवसाय कोणता करावा तर जो आपल्याला पसंत पडतो तो करा किंवा आपली शैक्शणिक पातळी पाहून सुध्दा व्यवसाय ठरवला जाऊ शकतो. तसेच महत्वाचे म्हणजे आपली आवड जपून जो व्यवसाय करावासा वाटेल तोसुध्दा करता येतो. व्यवसायात सुरूवात एखाद्या लघुउद्योगापासून केली तरी चालेल. कारण कोणतेही काम मनापासुन केले तर त्या आपण लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे महाकाय वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही आणि यासाठी आपल्याकडे पाहिजे तर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास. मग तो व्यवसाय कुठलाही असो, त्यात लाज वाटू न देता काम केले पाहिजे. कारण माझ्या अनुभवानुसार, मराठी माणसाचा एकच प्रश्न असतो. हे काम केले की लोक काय म्हणतील, आपल्या आई-वडीलांनी कधीच व्यवसाय केला नाही. मग मी का करू ? मराठी माणसाची परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारत चालली आहे. त्याला सुध्दा समजायला लागलेले आहे की काय करावे किंवा काय करू नये. परंतु ही परिस्थिती दुप्पट वेगाने बदलायला हवी, असे मनापासून वाटते. मी नेहमी बघते, इकडच्या मुलांचा नोकरीचा एकच हमरस्ता (शॉर्टकट) असतो. जास्तीत जास्त मुले I.T.I. करतात व पुण्या-मुंबईला कुठल्यातरी नोकरीला चिपकले म्हणजे आपले काम झाले असे त्यांना वाटते आणि विशेष म्हणजे कमी पगारावर काम करतात. परंतु ही मराठी मुलांची फ़ार वाईट परिस्थिती आहे. त्या कामातही मेहनत आहे, काम आहे. पण म्हणून का जीवनभर फ़क्त एका कंपनीतच कर्मचारी (लेबर) म्हणून काम करावे. मराठी मुलाने झेप घेणे फ़ार गरजेचे आहे. मग मी तर म्हणेन शेतीही केली तरी चालेल. कारण आपण शेती हाही एक व्यवसाय म्हणून पत्करू शकतो आणि शेतीत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग घेणे ही तर काळाची गरज आहे. आणि त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे जागे व्हा, संघटीत व्हा व व्यवसाय करा. आपल्याला माझे म्हणणे कसे वाटले ते सांगा व प्रतिक्रियासुध्दा अवश्य कळवा.

3 comments:

Murli said...

Job with social work opportunity. We are provide village level technology.
So we recruiting 'COORDINATOR' please call -:7798191319 only serious person

Murli said...

Job with social work opportunity. We are provide village level technology. So we are recruiting 'COORDINATOR' please call 7798191319 only serious person.

Jaypalsinh V. Girase said...

Ho sir Mi Sudha Vayacha 16 vya Varshi ssc pariksha Pass Zalo Aani ITi karnyacha Nirnay Ghetla ya sathi mazya parivaracha Virodh Hota pan Mitrancha Nadhat Lagun Mi iti karun Aaj dekhil Kami Pagarat Nokri Karit Aahe ...30 age Zale Kay Karu Samjat Nahi Khishat Aaj Dekhil Damdi Nahi Don Paise Milavet Manun Patrakarita Karun Part Taim 2 Jahirati milvun Kasetari Bhagvto Aahe Nokri sodnyacha Divasbharatun 100 vela vichar yeto Pan nirnay ghta yet Nahi Aata pls Aapanch Mala Margha suchawa...Jaypal Girase Dondaicha