हिंदु धर्म संस्कृतीत चार गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे कुलदेवता, कुलदैवत, इष्टदैवत आणि पितरांची सेवा.
१. कुलदेवता - कुलदोवता म्हणजे देवी. जिला आपण कुलदेवी म्हणतो. आपल्या वंशजांनी नित्य पूजेत जिला स्थान दिले जिच्यामुळे आपल्या कुळाचा, घराण्याचा उध्दार झाला अशा देवीला आपल्या वंशजांनी कुलदेवता मानले. म्हणून तेव्हापासून आपण लग्नात त्यांचा सन्मान करून पूजा करू लागलो. रोज तिची सेवा करतो.
संपूर्ण भारतातील देवीची मुख्य स्थाने -
१. काश्मिरची वैष्णवी
२. कोलकात्याची महाकाली
३. कन्याकुमारीची महासरस्वती
आपल्या महाराष्ट्रातील देवीची प्रमुख पीठे -
१. तुळजापूरची अंबा भवानी
२. माहुरची रेणुका देवी
३. कोल्हापुरची महालक्ष्मी
२. कुलदैवत - आपल्या वंशजांनी कुलदेवतेप्रमाणेच कुलदैवत मानले. कुलदैवत म्हणजे कुळाचा उध्दार करणारा देव. तो म्हणजे खंडोबा, जोतिबा, भैरवनाथ, महादेव, नृसिंह, अर्धनारी नटेश्वर इ. असून त्यांची सेवा घरातील कर्त्या पुरूषाने करावी.
३. इष्टदेवता - आपापल्या आवडीप्रमाणे उपासनेकरीता निवडलेला देव उदा. गणपती, विष्णु, दत्तप्रभू, श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ वगैरे यांचे मंत्र, स्तोत्र जप करावेत.
४. पितरांची सेवा - मासिक श्राध्द, वर्ष श्राध्द, संक्रांत, अक्षयतृतीया, सर्वपित्री अमावास्या, धूलिवंदन, चैत्र प्रतिपदा, त्रिपिंडी इ. या गोष्टी हिंदु धर्मात फ़ार महत्वाच्या मानल्या जातात. या गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. म्हणजे वैयक्तिक त्रास, घराला आलेली अवकळा दूर होऊन सुख, शांती मिळेल.
16.9.08
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
devak jar gavi jyachya gharat ahe,to adavanuk karat asel tar kai karave
Post a Comment