माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

23.9.08

रोगांपासून रक्षण कसे करावे?

काही खाद्यपदार्थ व पेय शरीरास आवश्यक असतात. परंतु ते इतर खाद्यपदार्थांबरोबर मिसळल्यास विषासारखे काम करता हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

हितकारी संयोग -
  • खरबुजासोबत साखर खावी
  • आंब्यासोबत गाईचे दुध घ्यावे
  • केळीसोबत विलायची खावी
  • खजुरसोबत दुध घ्यावे
  • भातासोबत दही खावे
  • चिंचेसोबत गूळ खावा
  • पेरुसोबत सोप खावी
  • टरबुजासोबत गूळ खावा
  • मक्यासोबत ताक घ्यावे
  • मुळ्यासोबत मुळ्याची पाने खावी
  • दह्याचा रायता खावा
  • गाजर आणि मेथीची भाजी खावी
  • जुन्या तुपासोबत लिंबाचा रस घ्यावा
  • पुरी किंवा कचोरीसोबत गरम पाणी प्यावे
  • शेंगदाण्यांसोबत गाईचे दुध, मठ्ठा प्यावा

अहितकारी संयोग -

  • दुधासोबत दही, मीठ, चिंच, आंबट फ़ळ खाऊ नये
  • दह्यासोबत खीर, दुध, पनीर खाऊ नये
  • खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, सत्तु खाऊ नये
  • मधासोबत मुळा, गरम पदार्थ किंवा पाणी पिऊ नये
  • तुपासोबत समप्रमाणात मध खाऊ नये
  • चहासोबत काकडी, खिरा खाऊ नये
  • भातासोबत व्हिनेगार घेऊ नये

अजीर्ण झाल्यास उपाय -

अधिक खाल्ल्याने त्रास झाल्यास खालील उपाय करावेत

  • केळी आणि एक किंवा दोन छोटी विलायची
  • जांभूळ आणि दोन आंबे किंवा मीठ
  • पेरू आणि सोप
  • लिंबु आणि मीठ
  • उडदा़ची डाळ आणि गूळ
  • चिंच गुळ
  • वांगी सरसोचं तेल

No comments: